१९९८
स्थापना वर्ष : २६ एप्रिल १९९८
आमच्या विषयी...
मुंबईतील वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ब्राह्मण कुटुंबे दादर, गिरगाव मधून डोंबिवलीत स्थलांतरित झाली. जसं जशी लोकवस्ती वाढत तसं तसे ब्राह्मण पोटजातीत वेग वेगळे संघ स्थापन होऊ लागले. कालांतराने महाराष्ट्रीय ब्राह्मण संघटनांना आपण एकत्र आलो तर एक मोठी शक्ती निर्माण होऊन स्वतःबरोबरच संपूर्ण समाजाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल असा विचार पुढे आला व त्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर १९९६ च्या दरम्यान चर्चा सुरु झाल्या.
चर्चेअंती सर्व महाराष्ट्रीय ब्राह्मण संस्थांचा संघ असावा असं ठरलं व त्यात कऱ्हाडे ब्राह्मण संघ, चित्तपावन ब्राह्मण संघ, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभा व कण्व परिषद असे सात संघ एकत्र येऊन ब्राह्मण महासंघ डोंबिवली ची स्थापना झाली. ...
अधिक वाचाराष्ट्रसीमा - "माझे योगदान आणि कर्तव्य"
"वसुधैव कुटुम्बकम्" हीच आपली विचारधारा व उदार भावना आपण मानत आलो आहोत आणि हीच मंगलकारी संकल्पना राष्ट्र या नावाने आपल्यामध्ये रुजली आहे. अर्थातच आपला सदाचार व उचित व्यवहार यामुळेच आपले अस्तित्व आजही टिकून आहे. अशी विचारधारा बाळगलेला हा समाज गेली हजारो वर्षे या भूमीतील प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंबीय मानत आला आहे ही अभिमानाची बाब आहे. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी" हा भाव आजही आपल्यामध्ये घर करून आहे.
अधिक वाचासंलग्न संस्था
छायाचित्रे
दत्तक योजना
ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आयोजित एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम
(गरजू ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग, गतिमंद आणि अंगण व्यक्तिमत्त्वांसाठी मदत अभियान)
हे अधिक माहितीकरिता संपर्क: सौ. माधुरी जोशी - 98204 69014 | सौ. सारंगी जोगळेकर - 98673 33262






